माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्या आत्म्या सोबत काय होतं… अत्यंत रोमांचक माहिती…

0
688

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ, मित्रांनो मनुष्याच्या मृ त्यू नंतर काय होतं याचा संदर्भ आपण गरुड पूरणातून घेत आहोत. आ त्मा जेव्हा आपलं शरीर सोडून जातो तेव्हा आ त्म्याला कळत असतं की आपण शरीर सोडलं आहे.

आपण शरीर सोडलं असल्यामुळे आपला मृ त्यू झालेला आहे हे आ त्म्याला कळत असतं. आ त्म्याला आपल्या माणसांची आठवण येत असते.

मित्रांनो असं म्हटलं जातं की मृ त्यूनंतर आ त्म्याला खुप दूरचा प्रवास करायचा असतो. या प्रवासात अनेक टप्पे असतात. आणि जर मनुष्याच्या मृ त्यू नंतर आपण त्याची आठवण काढत राहिलो तर त्यांना तो प्रवास पूर्ण करण्यात अडचणी येतात.

चला तर जाणून घेऊया मृ त्यु नंतर नेमकं काय होतं.

मृ त्यूनंतर प्रथम आपला स्थू ल देह म्हणजेच अन्नमय कोष  गळून पडतो. ज्याप्रकारे परिपक्व झालेलं फळ झाडावरून खाली पडते अगदी तसे.

त्यानंतर आपल्या शरीरात असलेले 10 प्राण क्रमाक्रमाने बाहेर पडतात. आपला आ त्मा 4 कोषांसह सूक्ष्म रूप धारण करून बाहेर पडतो. तेव्हा त्या देहाला मर ण येतं.

मित्रांनो आ त्मा हा अजरामर आहे. देहाभोवती हा आ त्मा घुटमळत असतो. मनुष्याच्या मृ त्यूनंतर घरात रडारड सुरू होते, शेवटी मृ त शरीरावर स्म शानभूमीत अ ग्नी संस्कार केले जातात. मनुष्याच्या जीवनातील तो शेवटचा यज्ञ असतो. म्हणुन याला अंतेष्टी असं म्हटलं जातं.

अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ. अंतेष्टी च्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ असा आहे की मृ त झालेल्या व्यक्तीला संबोधून हे मंत्र आहेत. कारण आ त्मा त्या ठिकाणी हजर आहे. आ त्मा हे सर्व पाहत असतो, ऐकत असतो.

त्या मंत्राचा अर्थ असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहिलेला नाही. तुम्ही आता पुढच्या मार्गाला निघून जा. त्याला गती प्राप्त होणं असं म्हटलं जातं. आता आम्ही तुमचा हा देह सुद्धा जा ळून टाकणार आहोत असं म्हणून त्या मृ त देहावर संस्कार केले जातात.

मित्रांनो जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेले मडके घेऊन प्रे ता ला डावी प्रदक्षिणा घालतो. याला अपसव्य असं म्हटलं जातं.

प्रदक्षिणा घालताना एका दगडाने खांद्यावर असलेल्या मडक्याला एक भोक पाडतात. अशा प्रकारे भोक पडलेलं मडके खांद्यावर घेऊन प्रे ताला 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि त्यानंतर प्रे ताच्या डोक्याजवळ उभं राहून ज्या दगडाने भोक पाडले त्यावर मडके पाडून फोडलं जातं.

दगडावर पडल्या वर त्या मडक्याचा फट असा आवाज होऊन ते फुटते. याला घट स्पो ट असं म्हणतात. या ठिकाणी डाव्या मनगटाने बों ब मारली जाते. आणि सांगितले जाते की तुमचा आणि आमचा संबंध संपला आता तुम्ही इकडून जा.

मग तो दगड गळ्यात असलेल्या वस्त्रा मध्ये बांधला जातो. याला अश्मा असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रेताला अ ग्नी दिला जातो. मित्रांनो आ त्मा या सगळ्या गोष्टी पाहत असतो. आपलं शरीर जळताना पाहून आ त्म्याला रडायला येतं.

मित्रांनो इथे कोणी अशी शंका घेऊ नका की आ त्मा का रडतो. तर मित्रांनो आ त्मा अजूनही चार कोषांमध्ये बद्ध आहे. यात मनोमल कोष असल्यामुळे आ त्म्याला वासना, भावना सुद्धा असतात.

प्रे ता ला अग्नी दिल्यानंतर आपण घरी येतो. आपला आ त्मा सुद्धा आपल्या सोबत घरी येतो. मात्र तो फडक्यात बांधलेल्या अष्म्यावर बसतो. त्यामुळे फडक्यात बांधलेला अष्म्या दाराच्या बाहेर ठेवला जातो.

मित्रांनो पुढचे दहा दिवस हा आ त्मा तिथे बसलेला असतो. त्यानंतर घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. यानंतर नमस्कार करून आलेली मंडळी निघून जातात. त्यानंतर घरातील इतर व्यक्ती अंघोळ वगैरे करून पिठलं भात खायला मोकळी होतात.

अशी अंध श्रद्धा आहे की मृ त व्यक्तीला त्याच्या पुढच्या प्रवासात पुढचा मार्ग दिसावा म्हणून दिवा लावला जातो. मित्रांनो जो दिवा लावलेला असतो त्याच्याखाली राख किंवा पीठ ठेवलं जातं.

असा समज आहे की मे लेल्या व्यक्तीला पुढचा जन्म कोणता मिळालेला आहे त्याचे पाऊल त्या पिठावर किंवा राखेवर उमटतात. पण हा समज पुर्णतः चुकीचा आहे. गेलेल्या व्यक्तीला लगेच दुसरा जन्म मिळत नाही.

दुसऱ्या जन्माची प्रक्रिया कोणती आहे ती आपण पुढे जाणून घेणार आहोत.

आता आपण जो दिवा लावलेला असतो तो मृ त व्यक्तीचे प्रतीक आहे. मित्रांनो आता आपल्याकडे फोटो काढण्याची पद्धत आहे. आपल्याकडे गेलेल्या व्यक्तीचे फोटो असतात, आपण त्या फोटोची पूजा करतो.

पण पूरातन काळी फोटो काढण्याची सोय नव्हती. त्यामुळे गेलेल्या व्यक्तीच्या आ त्म्या चे प्रतीक, आत्मज्योत म्हणून दिवा लावला जायचा. आणि तो दिवा पुढचे दहा दिवस तेवत ठेवला जायचा. आपला आ त्म पुढचे दहा दिवस हा घराबाहेर अ ष्म्या वर बसलेला असतो.

10 दिवसानंतरच आ त्म्याचा पुढचा प्रवास सुरु होतो. मित्रांनो या दहा दिवसांत आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, जवळचे लोक भेटायला येतात. घरातील व्यक्ती गेलेल्या व्यक्ती बद्दल दुःख व्यक्त करून रडत असतात.

बाहेरून सां त्वन करायला आलेल्या व्यक्ती गेलेल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतात. पण घरातून बाहेर पडले की त्याच व्यक्ती आपल्याबद्दल वाईट बोलतात. हे सगळं आ त्मा पाहत असतो, ऐकत असतो.

आपल्याबद्दल कोणाला खरं दुःख आहे, कोण खरं रडत आहे, कोण खोटं दुःख व्यक्त करत आहे हे सर्व आ त्म्याला कळत असतं. हे सर्व पाहून आ त्म्याला खूप दुःख होतं आणि त्याला रडायला येतं.

या दहा दिवसांत प्रे ताची रक्षा, अ स्थी यांचं विसर्जन माती किंवा तांब्याच्या कलशातून कलशा बरोबरच करावं.

मित्रांनो दहाव्या दिवशी अष्म्याला घेऊन घाटावर जातात. तिथे अग्नी देणाऱ्याने आपल्या डोक्यावरील केस, दाढी, आणि मिशा काढाव्यात.

या घाटावर जो विधी केला जातो तो म्हणजे कायस्तव. दहाव्या दिवशी ज्या अष्म्या वर आ त्म्याचा वास असतो, तो अष्म्या घेऊन घाटावर येतात. दाढी, केस काढतात आणि त्या आ त्म्याला सदगती मिळण्यासाठी संस्कार केले जातात.

आता ते संस्कार म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आपण रोज कळत न कळत अनेक पाप करत असतो. आपण जेव्हा एखादे पुण्यकर्म, व्रत किंवा संस्कार करत असतो तेव्हा आपण स्वतःला शुद्ध करावं. आपण केलेले पाप आपल्या देहात आपल्या केसांना घट्ट धरून बसतात आणि म्हणून आपले दाढी आणि केस काढावेत.

मित्रांनो शास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे की प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला प्रत्येकाने केस काढावेत.

थोडक्यात एका गेलेल्या व्यक्तीला सदगती मिळवून देणे हे सुद्धा एक पुण्यकर्म आहे. यामागे गेलेल्या व्यक्ती बद्दल आपलं प्रेम, कृतज्ञता, भावना व्यक्त करण्याची प्रथा.

मित्रांनो दहाव्या दिवशी 3 पिंड करून त्याच्या शेजारी अष्म्या ठेवला जातो. त्यानंतर त्याला मंत्रयुक्त पिंडा मध्ये विलीन केले जाते आणि सांगितले जाते की तुमचा देह जाळून टाकला आहे. तुमच्या नावाने केस काढून शौर्य केलेलं आहे. आता तुमचं इथे काहीही शिल्लक नाही.

आता तुम्ही पुढच्या मार्गाने सदगतीला जा असं सांगणारा विधी केल्यानंतर तो पिंड बाजूला नेऊन ठेवतात.

मित्रांनो त्या आ त्म्याची वास ना कशातच राहिलेली नसेल तर कावळा त्या पिंडाला पटकन शिवतो. अन्यथा तासनतास गेले तरी तो पिंडाला शिवत नाही. कारण आ त्मा पिंडावर बसलेला असतो आणि तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही.

कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की ज्यांना मृ त्यु आणि आ त्मा दिसतो. म्हणून कोणी मरणार असेल तर तिथली कुत्री भेसूर रडतात.

कावळा शिवल्यानंतर सगळे जण आपल्या अंगठ्याने त्या अष्म्याला पाणी देतात. याला तर्पण असं म्हणतात.

अंगठ्या वरूनच पाणी का द्यावे. मित्रांनो ऋषी मुनी आणि पिंडाला पाणी देताना अंगठा आणि त्याच्या शेजारी असणारे बोट हे पितरकांना पाणी देण्यासाठी वापरावीत.

मधले बोट हे आपल्या कपाळावर गंध लावण्यासाठी वापरावे. करंगळी च्या बाजूचे बोट म्हणजे अनामिका याने देवांना गंध लावावा.

देवांना पाणी देताना सरळ हाताने द्यावे. तर्पण करताना करंगळी च्या बाजूने तिरपी ओंजळ करून पाणी द्यावे. आणि पितरांना अंगठ्याच्या बाजूने तिरपा हात करून पाणी द्यावे.

जवळची व्यक्ती गेल्यानंतर सुतक असेल आणि आपलं काम अत्यंत आवश्यक असेल, तर आपल्या कार्यलयात, ऑ फिस मध्ये जाऊ शकतो का. अशा वेळी काय करावे.

मित्रांनो सुतक असेल अशावेळी घरात देवपूजा अथवा कोणतेही मंगलकार्य करू नये. किंवा कोणाच्या मंगलकार्यास जाऊ नये. मंदिरात जाऊ नये, मात्र बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही.

आपला नित्यनियम करावा. हरिपाठ आणि गायत्री मंत्र सोडून इतर किटर्न, प्रवचन केल्यास काहीही हरकत नाही. आपल्या कामावर, ऑ फिस मध्ये जाण्यास काहीही हरकत नाही.

मात्र ज्याने अग्नी दिलेला असेल त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत. 10 दिवस घराबाहेर जाऊ नये. सुतक असेल त्यावेळात गादी, पलंग वर झोपू नये. चहा सोडून कोणतेही गोड पदार्थ खाऊ नयेत.

दररोज अंघोळ करावी मात्र कपाळावर टिळक लावू नये. अत्तर, स्प्रे किंवा पर फ्यु म वापरू नये. नवीन कपडे घालू नयेत. बाकी आपले रोजचे व्यवहार चालू ठेवावेत.

दहाव्या आणि अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरुन अंघोळ करावी. सुतकातील सर्व कपडे धुवावेत. आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे.

अकराव्या दिवशी कपाळावर गंध लावावा. अकराव्या, बाराव्या आणि तेराव्या दिवशी आ त्म्याच्या पुढील गती साठी असणारे विधी करावेत.

चौदाव्या दिवशी घरात नि धन शांत आणि उधग शांत करावी आणि देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकरी आणि नातेवाईक यांना गोडाचे जेवण द्यावे.

संध्याकाळी अ ग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी, खांद्यावर टॉ वेल किंवा उपरणे घालावे. शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे.

शंकर ही मृ त्यु ची देवता आहे. आ त्म्यास सदगती प्राप्त व्हावी आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना करून आपल्या डोक्यावरील टोपी आणि खांद्यावर असलेले उपरणे तिथेच ठेवावे आणि घरी यावे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here