नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतिला विशेष महत्व प्राप्त आहे. खासकरून स्त्रिया या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हटले जाते.
या दिवशी सूर्याचे गोचर होत असल्यामुळे ज्योतिषशानुसार हा दिवस विशेष महत्वपूर्ण मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. त्यामुळे सूर्याचा खूप मोठा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो.
सूर्यदेव धनु राशीतून निघून मकर राशीत गोचर करणार आहेत. भगवान सूर्यदेव हे ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात. ते सुख समृद्धी , वैभव , यश , पद्प्रतिष्ठा आणि पराक्रमाचे कारक आहेत. ते मानसन्मानाचे देखील कारक ग्रह आहेत.
सूर्याच्या होणाऱ्या राशीपरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो. सूर्य जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही.
यावेळी संक्रांतीला त्रिग्रही योग बनत आहेत त्यामुळे हि संक्रांत विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. संक्रांतीला होणारे हे राशीपरिवर्तन तूळ राशीसाठी अत्यंत लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे आता दूर होणार आहेत. मकरसंक्रांती पासून आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांचा अपूर्ण राहिलेला संघर्ष आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनात परमसुखाची अनुभूती देखील आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती आणि करियर मध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरीत देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. नोकरीत सहकारी आपल्याशी नम्रतेने वागतील. या काळात मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला पूर्णपणे लाभणार आहे. कठीण काळ आता समाप्त होणार आहे.
मार्गात येणारे अडथळे दूर होतील. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील होणार आहे. एखाद्या चांगल्या मित्रांचे मार्गदर्शन देखील तुम्हाला लाभू शकते. नाते संबंधांत गोडवा निर्माण होणार आहे. नात्यातील कटुता मिटणार असून नात्यात गोडवा निर्माण होणार आहे.
अनेक दिवसांपासून ठरवलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. प्रत्येक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात कोणतेही काम करताना घाई गडबड करू नका. योग्य वेळी योग्य सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम ठरणार आहे.
या काळात केलेली गुंतवणूक पुढे चालून खूप मोठा लाभ देऊ शकते. त्यामुळे गुणतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रेम जीवनातील सुखात वाढ होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग जुळून येत आहेत. प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण देखील वाढू शकतो पण कामे यशस्वी रित्या पूर्ण होत असल्यामुळे मन समाधानी असेल. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. वैवाहिक जीवनासाठी देखील हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
पती पत्नी मधील वाद या काळात मिटण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. सर्व काही ऑलवेल असले तरी या काळात वाईट संगती पासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्यसनांपासून देखील दूर राहणे गरजेचे आहे.
रागावर नियंत्रण ठेवा. एकाग्र चित्तेने मन लावून काम केल्यास प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते. सूर्यदेवांच्या कृपेने तुम्हाला स्वतः मध्ये एका नव्या ऊर्जेची अनुभूती देखील होणार आहे.
सासरच्या मंडळींकडून एखादी खुशखबर कानावर येऊ शकते. आपल्या संतती कडून देखील एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरीत परिवर्तन देखील घडून येऊ शकते. या काळात अडचणी जरी आल्या तरी घाबरून जाऊ नका. प्रत्येक अडचणीवर मार्ग निघणार आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.