तूळ रास, दिनांक 14 में अक्षय तृतीया अचानक चमकून उठेल तुमचे भाग्य मिळेल मोठी खुशखबर…

0
455

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. शुभ संयोग आणि शुभ घटिका जमून आल्या कि मांगल्याचे दिवस यायला वेळ लागत नाही.

दिनांक 14 मे पासून असाच काहीसा सुंदर आणि शुभ काळ तूळ राशीच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील परिस्थिती मध्ये खूप मोठा बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होणार आहे. इथून आपले नशीब एक नवी कलाटणी घेणार असून आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरवात होणार आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मित्रानो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते.

यावेळी वैशाख शुक्ल पक्ष दिनांक 14 मे रोज शुक्रवार अक्षय तृतीया असून शास्त्रानुसार हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आला आहे. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय किंवा विशेष अनुष्ठान केले जातात.

मान्यता आहे कि या दिवशी माता लक्ष्मी अतिशीघ्र प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही.

सोने अथवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आला आहे. संपूर्ण साडे तीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेला प्रमुख स्थान प्राप्त आहे. या दिवशी पूजा पाठ, दान धर्म, यज्ञ, पितृ तर्पण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

या वर्षी अक्षय तृतीया शुक्रवारी येत असून पंचांगानुसार सूर्य आज वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी शोभन नामक योग बनत आहे.

अनेक वर्षांनंतर हा शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून राजयोगाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने धन लाभाचे योग जमून येणार आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.

धन धान्य, सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने आपले जीवन बहरून येणार असून येणारा काळ आपल्या दृष्टीने अनुकूल बनणार आहे. या काळात आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून आपण ठरवलेल्या योजना पूर्ण होणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार असून आपल्या स्वप्नांना नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार असून स्वप्ने साकार होण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. या काळात शत्रू पासून सावध राहण्याची आवश्यकता असून स्वार्थी मित्रांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भौतिक सुख संपन्नतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

अशाच माहितीपूर्ण आणि राशी भविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here