नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा लहान मुलं असतील, ती मुलं सारखी आजारी पडत असतील, ती सारखी चिडचिड करत असतील, अशावेळी आपल्याला सुचत नाही काय करावं. हे सारखे आजारी का पडतात असा प्रश्न पडतो.
तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी सुद्धा या समस्या असतील तर आजचा हा उपाय केल्याने कायमच्या कमी होतील. या उपायाने घरातून आजारपण सुद्धा निघून जाईल. मुलांचा चिडचिडेपणा कमी होईल.
मित्रांनो हा उपाय पुरुष अथवा महिला कोणीही करू शकतं. फक्त पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करा. चला तर जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा.
हा उपाय आपण कधीही करू शकता. कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. ज्या दिवशी आपण हा उपाय करायला सुरू कराल तेव्हापासून पुढील 3 महिने आपण हा उपाय करावा.
रोज रात्री आपण आपल्या देवघरात हा उपाय करू शकता. एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात ठेवावे. आणि देवघरात देवा समोर बसून 11 वेळा महा मृत्युंजय मंत्राचा जाप करावा.
मित्रांनो महा मृत्युंजय मंत्र हा आपल्या स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथी मध्ये दिलेला आहे. तुम्हाला महा मृत्युंजय मंत्र माहीत नसेल तर तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राचा जाप सुद्धा करू शकता.
पण तुमच्या कडे स्वामी समर्थ यांच्या नित्य सेवा पोथी असेल तर त्यात असलेल्या महा मृत्युंजय या मंत्राचा जाप करू शकता.
11 वेळेस महा मृत्युंजय किंवा स्वामींचा तारक मंत्र बोलून झाल्यानंतर ते एक ग्लास पाणी आपल्या लहान मुलांना प्यायला द्यायचं आहे. 2 किंवा जास्त मुलं असतील तर प्रत्येकाला वाटून ते पाणी प्यायला द्या.
मित्रांनो हा छोटा उपाय सलग 3 महिने करा. या उपायाने तुमच्या घरातील आजारपण कायमचे निघून जाईल. तुमच्या मुलांची होणारी चिडचिड सुद्धा कमी होईल.
पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या मुलांना फायदा होईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.