रक्षाबंधन – पूजेच्या ताटात नक्की ठेवा हि १ वस्तू .भाऊ आणि बहीण दोघेही व्हाल श्रीमंत

0
348

नमस्कार मित्रानो

मित्रानो रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली या दिवसाची सर्वात जास्त वाट बघत असतात.

कारण हा दिवस म्हणेज त्यांच्या हक्काचा त्यांच्या सुट्टीचा दिवस असतो. बहीण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधायला येते तेव्हा ती एका ताटात कुंकू , तांदूळ , नारळ , राखी , मिठाई , दिवा व पाण्याने भरलेला कलश अशी संपूर्ण सामग्री घेते व ताट सजवते.

भावाला ओवाळताना या ७ वस्तू ताटात असणे अनिवार्य आहे. पूजेच्या ताटात या ७ वस्तू ठेवण्यामागे काय कारण आहे ? याचे काय महत्व आहे ते आता आपण पाहूया.

कुंकू – मित्रानो ओवाळताना बहीण सर्वप्रथम कुंकवाचा टिळा लावते. कुंकू सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. कुंकवाचा टिळा लावल्याने भावावर सूर्यदेवाची कृपा दृष्टी पडते व बहीण भावासाठी सूर्य देवांकडे प्रार्थना करते कि येणाऱ्या वर्षात आपल्या भावाला सर्वप्रकारचे यश व प्रसिद्धी मिळावी.

तांदूळ – कोणत्याही पूजेत तांदळाला सर्वात शुभ मानले जाते आणि तांदळाशिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकू लावून त्यावर तांदूळ लावते. जे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. बहीण अशी प्रार्थना करते कि माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारची शुभता व पवित्रता यावी. माझे आणि भावाचे संबंध कायम असेच प्रेम भावनेने टिकून राहावे.

नारळ – नारळाला पूजे श्रीफळ म्हटले जाते. नारळ राहू ग्रहाशी संबंधित आहे. बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो कि येणाऱ्या वर्षात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळत राहोत व त्याचे जीवन आरामदायक आनंदी असो.

राखी – मित्रानो राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते. हे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. याद्वारे असा संदेश मिळतो कि बहीणीची प्रार्थना आहे तिच्या भावाने तिचे प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संकटात रक्षण करावे.

मिठाई – राखी बांधून झाली कि बहीण भावाला मिठाई भरवते व त्याचे तोंड गोड करते. मिठाई गुरु ग्रहाशी संबंधित आहे. त्याद्वारे अशी प्रार्थना केली जाते कि माझ्या भावावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव असावी. भावाची मुले मुली त्याचे वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहावे.

दिवा – मित्रानो बहीण आपल्याला भावाला दिव्याने ओवाळते. दिवा शनी व केतू ग्रहाशी संबंधित आहे. बहीण आपल्या भावासाठी प्रार्थना करते कि माझ्या भावाच्या जीवनात येणारे सर्व रोग , सर्व प्रकारच्या बाधा आणि त्रास दूर व्हावे.

पाण्याने भरलेला कलश – बहीण पाण्याने बहरलेल्या कलशाने भावाची पूजा करते. पाण्याने भरलेला कलश चंद्राशी संबंधित आहे. ओवाळताना बहीण अशी प्रार्थना करते कि माझ्या भावाच्या जीवनात मानसिक शांतता रहावी. त्याला कोणत्याही प्रकारचे टेन्शन असू नये. त्याने आपले जीवन शांततेत जगावे.

मित्रानो बुध ग्रहाला बहिणीचा कारक ग्रह मानले जाते. राखी बांधून पूजा झाल्यानंतर तुम्ही बहिणीला जी भेटवस्तू देता त्यामुळे तुमचा बुध ग्रह शुभ होऊन तुम्हाला टायचे शुभ फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते कि बुध ग्रह आपल्या व्यापाराशी संबंधित कार्य करतो.

जर तुम्हाला भावाचे किंवा बहिणीचे आशीर्वाद मिळाले तर तुमच्या व्यापार व्यवसायात वृद्धी येईल. यासाठी आपल्या बहिणीला कधीही नाराज न करता तिला नेहमी भेटवस्तू देऊन तिचे आशीर्वाद मिळवत राहावेत व आपल्या व्यापार व्यवसायात प्रगती करीत राहावी.

तर मित्रानो या होत्या त्या वस्तू ज्यामध्ये बहिणीच्या आशीर्वादामुळे भावाचा येणारा काळ खूप शुभ होतो. म्हणूनच उत्सवात व आनंदात हा रक्षाबंधनाचा सण साजरा करावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्या पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here