नमस्कार मित्रांनो,
आज आपण आपल्या शरीरात असलेल्या उष्णतेबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो आता थंडीचे दिवस जाऊन उष्णता वाढायला लागली आहे. गर्मी वाढतेय.
थंडीच्या दिवसात हातापायाला भेगा पडणे, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या येतात. त्याच प्रकारे उन्हाळ्यात आपल्या शरीरात उष्णता वाढायला लागते.
शरीरात उष्णता वाढल्याने बऱ्याच लोकांना पिंपल्स येणे, अंगाला खाज सुटणे असे बरेच प्रकार घडतात. पावसाळ्यात आपली स्किन सॉफ्ट होते. हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे आपली स्किन कोरडी पडते.
मित्रांनो या सर्व समस्या होण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे उष्णता. आपल्याला या समस्या कमी करायच्या असतील तर आपल्या शरीरातील उष्णता कमी करावी लागेल. उष्णता कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो.
आज आपण नैसर्गिकपणे आपल्या शरीरात असलेली उष्णता कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो आपल्या पैकी अनेक जणांना करंजी चे झाड माहीत असेल. बाजारात करंजी चे तेल सुद्धा मिळते. ते तेल आपण आपल्या हाताला आणि पायाला लावलं तरी आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो तुम्हाला हे करंजी चे तेल कोणत्याही आयुर्वेदिक औषध दुकानात मिळेल. रात्री झोपताना आपल्या हाताला आणि पायाला करंजी च्या तेलाने मसाज करा. आपल्या त्वचे मध्ये ते तेल मुरलं पाहिजे अशा प्रकारे मसाज करा.
या तेलाने आपल्या शरीरात असलेली उष्णता कमी होते. दाह कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो शरीरात असलेली उष्णता कमी करण्यासाठी आपण आणखी एक सोपा उपाय पाहणार आहोत.
करंजीच्या झाडाची पाने आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत. पाणी उकळताना त्यात करंजीची पाने टाकावीत. आणि त्या पाण्याने जर आपण अंघोळ केली तर आपल्या शरीरात असलेली उष्णता निघून जाईल, त्वचा रोग असतील तर ते दूर होतील, त्वचे संबंधित असलेल्या सर्व समस्या निघून जातील.
उष्णता असल्यामुळे आपल्या शरीराला खाज सुटते. ती खाज पूर्णपणे बंद होईल. त्वचा कोरडी असल्याने पांढरी पडते ती समस्या सुद्धा याने दूर होईल.
आपल्या शरीरावर, आपली त्वचा कोंडा निघाल्या सारखी निघते. आपली मृ त स्किन निघून जायला आपल्याला ही करंजी ची पाने अत्यंत लाभ दायक ठरतात.
तुम्हाला उष्णता, शुगर याचा मोठ्या प्रमाणात त्रास असेल तर, आपण पुढचा उपाय अवश्य करावा.
आपल्याला या उपाया साठी लागणार आज पळसाचे पान. पळसाची पाने 3 च असतात. अशी म्हण सुद्धा आहे कुठेही गेलं तरी पळसाला पाने तीनच. मित्रांनो आपल्याला या पळसाच्या पानांचा रस दोन चमचे काढून प्यायचा आहे. पळसाची पाने आपल्याला आपल्या आजूबाजूला सहज मिळतील.
पळसाची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. आणि बारीक करून त्याचा रस काढावा. हा रस दोन चमचे घेतल्याने आपल्या शरीरात असलेली सर्व उष्णता कमी होऊन, आपल्याला त्वचे शी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
मित्रांनो पूर्वीच्या काळी लग्न, समारंभ वगैरे मध्ये जेवण वाढण्यासाठी ज्या पत्रावळ्या वापरल्या जायच्या त्या पळसाच्या पानाच्या बनवलेल्या असायच्या. या पत्रावळी वर जेवताना अन्नात असलेली उष्णता शोषुन घेण्याचे काम ही पत्रावळी करते. आणि आपल्याला सात्विक भोजनाचा आस्वाद मिळायचा.
आजही आपण पळसाच्या पानावर जेऊन बघा. जेवणाची चव पूर्णपणे बदललेली असेल.
तर अशा या पळसाच्या पानाचा रस सकाळी उपाशी पोटी फक्त 2 चमचे पिला तर शरीरात असलेली सर्व उष्णता निघून जाईल. कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग कमी होण्यास मदत होईल.
एकदा आपल्या शरीरात असलेली उष्णता कमी व्हायला लागली की आपल्या पोटाची चर बी सुद्धा कमी होईल. पोट एकदम सपाट होईल. पोटाचा घेर कमी होईल.
मित्रांनो उपाय सोपे आहेत एकदा करून पहा. आयुर्वेदिक उपाय असल्या मुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत.
मित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.