नमस्कार मित्रांनो
मित्रानो आपले थोरं मोठे लोकं सांगतात माणसाने शंभर कामं सोडून स्नान केले पाहिजे आणि हजार कामं सोडून भोजन केले पाहिजे. मनुष्याचे जीवन भोजनावर अवलंबून आहे. अन्यथा जीवन असंभव आहे.
शास्त्रामध्ये काही असे नियम सांगितले आहेत, ते प्रत्येक माणसाने पाळले पाहिजेत. जर तुम्ही शास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या नियमांचे पालन करत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये असंख्य समस्या येऊ शकतात. आणि त्याबद्दल तुम्हाला माहितीही नसते. आज आम्ही त्या नियमांबद्दल माहिती सांगणार आहोत.
हिंदू धर्मानुसार भोजनाआधी दोनही हात-पाय आणि तोंड या पंच अंगांना धुवूनच भोजन केले पाहिजे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, ओले पाय करून जेवणारी व्यक्ती दीर्घायुष्य प्राप्त करतात. प्रत्येक मनुष्याने दोनच वेळेस भोजन करण्याचे सुचित केले आहे.
प्रात:काळ आणि सायंकाळ. मध्येच भोजन करण्याचा विधी सांगितलेला नाही. जो या नियमांचे पालन करतो त्याला उपवास करण्याचे पूर्ण फळ प्राप्त होते. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून केले पाहिजे. पूर्व कडे तोंड करून जेवल्यास आयुष्य वाढते.
दक्षिणेस तोंड करून जेवल्याने मृत्यू लवकर ओढवतो. पश्चिमेस तोंड करून जेवल्याने अनेक रोग मागे लागतात. उत्तरेस तोंड करून जेवल्याने आयुष्य आणि धनाची वृद्धी होते. जर तुम्ही नियमानुसार भोजन करत असाल तर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.
एक गोष्ट लक्षात घ्या शास्त्रात हेही लिहिले आहे की कोणत्याही व्यक्तीचे उष्ट अन्न सेवन करू नये. हे निशिद्ध आहे. बऱ्याचदा पतीचे उष्टे अन्न पत्नी खाते.. आपण विचार करतो उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढते पण या गोष्टी लोकांना भुलवणाऱ्या आहेत. शास्त्रानुसार हे चांगले मानले जात नाही.
पती पत्नीस कधीही सोबत एकत्र एकाच थाळीमध्ये भोजन केले नाही पाहिजे. जर असे केले तर त्या घरात दारिद्रता नांदते. म्हणून नेहमी शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच भोजन केले पाहिजे.
जर शास्त्रानुसार तुम्ही जीवन जगाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात समस्या येणार नाहीत. आजसाठी एवढेच! आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. ही माहिती तुम्ही आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद!
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.