नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये नारळी पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले गेले आहे. श्रावण महिनातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवभक्तांसाठी हे पर्व अतिशय लाभकारी मानण्यात आले आहे. कारण या वेळी श्रावण महिना चालूं आहे आणि या दिवशी रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा होत आहे.
भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला रक्षाबंधनात बांधणारा हा सण मानला जातो. या दिवशी बहिणी मोठ्या आनंदाने भावाच्या मनगटावर राखी बांधतात. भाऊ देखील आनंदाने बहिणींकडून राखी बांधून घेतात.
या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान करून दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. सोबतच पितरांचे तर्पण करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. मान्यता आहे कि या दिवशी भगवान भोलेनाथा बरोबरच लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
नारळी पौर्णिमेचा हा पर्व या काही भाग्यवान राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार असून नारळी पौर्णिमेपासून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता जीवनातील अमंगल काळाचा अंत होणार आहे. या काळात ग्रह नक्षत्र आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत.
ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव भाग्योद्य घडवून आणण्यास सुरवात करेल. जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
हा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. मित्रानो उद्या दिनांक २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी नारळी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक २२ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. नारळी पौर्णिमेचा हा संयोग या काही खास राशींच्या जीवनात उत्साहाचे दिवस घेऊन येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक लाभदायक आणि आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत.
आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून मार्गात येणारे अनेक अडथळे दूर होणार आहेत. जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होईल. प्रगतीचे नवे पर्व सुरु होणार आहे. अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे.
आपल्या मानसन्मान आणि यश कीर्तीबरोबरच धन संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जीवनातील कठीण काळ आता समाप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.