नमस्कार मित्रांनो,
शरीरातील वात कफ व पित्त या त्रिदोषात बिघाड झाल्यास शरीराचे संतुलन बिघडते. याचा एकत्रित परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीरातील नाजूक अवयवांवर याचा परिणाम विशेष पूर्वक जाणवतो.
मित्रांनो आपल्या शरीराचा नाजूक भागांपैकी एक भाग आहे तो म्हणजे डोळा. डोळा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. डोळ्याच्या समस्या अनेक व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात.
डोळे लाल होणे, डोळ्यांना ड्रायनेस होणे, दूरचे किंवा लांबचे कमी दिसणे सोबतच चष्म्याचा नंबर वाढणे. चष्मा कायमचा जाण्यासाठी आपण आजचा हा उपाय पाहत आहोत.
आजचा हा उपाय करण्यापूर्वी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या रोजच्या आहारात विटामिन ए चे जास्तीत जास्त सेवन करावे. सोबतच व्यायाम केल्याने याचा खूप फायदा होतो. सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर थंड पाण्याने आपले डोळे धुतल्याने याचा खूप फायदा होत असतो.
सोबतच बऱ्याच माळकरी व्यक्तींना कीर्तन आवडते. त्या व्यक्तीला किर्तन आवडते त्यात सलग दोन तास टाळी वाजवण्याचा खूप फायदा होतो. हे एक प्रकारचे ऍ क्यु प्रे शर आहे. ऍ क्यु प्रे शर मुळे डोळ्याचे कार्यक्षमता वाढते. रस्त्याच्या कडेला, रेल्वे, सिग्नलवर बरेचसे तृती यपंथी आपल्याला टाळी वाजवताना दिसतात. तुम्ही जर निरीक्षण केले असेल तर अशा व्यक्तींना चष्मा क्वचितच लागलेला असतो.
हे हि निरीक्षण पाहण्यासारखे आहे. सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा टाळी वाजवा आणि हा घरगुती सोपा उपाय करा. या उपायसाठी लागणारा सर्वप्रथम पदार्थ आहे तो म्हणजे गुळवेल.
गुळवेल आपल्या शरीरातील त्रिदोषांचे शमन करतो. शरीर संतुलनासाठी हे खूप फायद्याचे ठरते. म्हणून आजच्या उपया मध्ये आपण गुळवेलच्या चूर्णाचा वापर करणार आहोत.
साधारण पाच-सहा चमचे गुळवेल चे चूर्ण घ्यावे. पुढील पदार्थ आहे हिरडा चूर्ण. हिरडा चूर्णही आपल्याला पाच समस्या लागणार आहे. पुढील पदार्थ आहे बेहडा चूर्ण. या उपायासाठी बेहडा चूर्ण ही आपल्याला पाच चमचे लागणार आहे. यानंतर आपल्याला कोणता पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर.
सहजरित्या कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअर मध्ये आपल्याला आवळा पावडर उपलब्ध होईल. आवळा पावडर ही आपल्याला लागणार आहे पाच चमचे. तर मित्रांनो हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे. हे मिश्रण प्रत्येकी अंदाजे 50 ग्रॅम आहे. नंतर साधारणपणे दोन कप पाणी घ्यावे. नंतर या मिश्रणात पैकी एक चमचा या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
पाणी उकळवून अर्ध करून घ्यायचे आहे. म्हणजे दोन कपाचे एक कप झाल्यानंतर आपणास गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्यानंतर असा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पिंपळी. लेंडी पिपंळी सहज उपलब्ध होते. ती लागणार आहे साधारणपणे एक ग्राम. त्या गरम मिश्रणात एक चमचा पिंपळी आपल्याला त्यात टाकायचे आहे.
तो काढा थंड होऊ द्या. यात आपल्याला टाकायचा आहे एक चमचा मध. हे तयार झालेले मिश्रण आपल्याला सकाळी काहीही न खाता पिता घ्यायचे आहे. हा उपाय सलग एक महिना केल्यास डोळ्याच्या कसल्या ही समस्या आपल्याला राहणार नाहीत.
आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा. ही माहिती आवडली असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
अशाच माहितीपूर्ण लेख, उपाय यांसाठी आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.