चुकूनही दुसऱ्या कोणाला देऊ नका या 10 वस्तू… लक्ष्मी साथ सोडून जाईल… बरबाद व्हाल…

0
364

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ठराविक एन र्जी असते. काही वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असते तर, काहीत नकारात्मक ऊर्जा असते. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हवे असेल तर, आपल्याला अवतीभवती आणि स्वतः मध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करायला हवा. आपल्या जवळच्या काही वस्तू लोकांना  देणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने आपलं घड्याळ कधीच कोणाला देउ नये. कारण वेळ ही सर्वात पॉ वरफुल गोष्ट आहे. जर तुमचे घड्याळ कोणी मागायला आले तर त्याला तुमच्याकडिल घड्याळ कधीच देऊ नका, कारण घड्याळ देणे म्हणजे आपण त्याला आपलं नशीब देण्यासारखे आहे. घड्याळामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. आपलं नशीब हे त्या घड्याळशी अगदी जवळून जोडलेले असते. त्यामुळे कधीच कोणाला आपलं घड्याळ देऊ नका.

मित्रांनो उधारी कधीच ठेवू नका. जर तुम्ही उधार घेतलं असेल तर ताबडतोब त्याला परत करा. उधारी आणि कर्ज  यामध्ये फरक आहे. तसेच आपण जे कपडे वापरत आहोत ते तुम्ही दुसऱ्या कुणालाही देऊ नका किंवा दुसऱ्याचे तर अजिबात वापरू नयेत. जर तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरले तर तुमच्या घरा मध्ये भांडणे, कलह, वादवि वा द निर्माण होऊ शकतात.

पुढची गोष्ट आहे ती खास महिलांसाठी आहे. महिलांनी रात्रीच्या वेळी कोणत्याही व्यक्तीला दूध, दही किंवा ताक अजिबात देऊ नये. आपण जर एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दूध, ताक देत असाल तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि त्याचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात. मित्रांनो काही जणांना पेन, पेन्सिल मागण्याची सवय असते. दुसऱ्याचा  पेन अजिबात वापरू नका कारण त्याने त्याच्या लक्ष्मीमध्ये नक्कीच घट होईल.

मित्रांनो पुढील गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा रुमाल सुद्धा आपण एकमेकांसोबत शेअर करू नये. त्याने घरात दारिद्र्य येते. त्यानंतर आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा शक्यतो पाहुण्यांसाठी वेगळी व्यवस्था करा. आपली ज्या ठिकाणी  बेडरू म आहे ती त्यांना वापरू देऊ नका. त्यांना वेगळी जागा द्या. कारण जर तुम्ही वापरत असलेले कपडे आणि बेडरू म त्यांना देत असाल तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते.

पैशांची चोरी करून किंवा लबाडीने पैसा कमाऊ नका. कारण अशी लक्ष्मी आपल्याकडे आणखी फार काळ टिकत नाही. कारण हा  कमावलेला पैसा  तुम्हाला कधीही सुख देणार नाही. त्यामुळे असा पैसा दानधर्म केल्याने तुमचे पा प कमी होऊ शकते.

जर आपल्याला कोणी एखादी वस्तू भेट दिली असेल तर त्याचा अवश्य स्वीकार करावा. कारण भेट दिलेल्या वस्तूमध्ये समोरच्या व्यक्तीच्या भावना व्यक्त होत असतात. तसेच तो त्याच्या मनापासून भेट देत असतो. वर सांगितलेल्या वस्तू कधीच दुसऱ्या कडून घेऊ नका किंवा आपल्या वस्तू दुसऱ्याला देऊ नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here