संध्याकाळी चुकून सुद्धा करू नका ही 3 कामे… माता लक्ष्मी जाईल घर सोडून…

0
319

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो काही कामांची वेळ ही ठरलेली असते, जसे सृष्टीतील घडणाऱ्या गोष्टींचे नियम असतात, त्या गोष्टी त्या त्या वेळीच घडत असतात.

अगदी तसंच मानवी जीवनात प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला महत्व आहे, ज्यामुळे तुम्ही ती कामे त्याच वेळी केल्याने अधिक लाभ मिळवू शकता. इतकेच काय तुम्ही त्याच्या होणाऱ्या विपरीत परिणामांपासून स्वतःला वाचवू शकता.

मित्रांनो अशी काही कामे आहेत जी तुम्ही संध्याकाळी करू नका, अशी कामे सायंकाळी केल्याने लक्ष्मीचे वास्तव्य घरातून कायमचे निघून जाते.

सकाळ आणि सायंकाळ या प्रहरी काही ठराविक कामे ठरलेली आहेत, त्यामुळे तुम्ही ही कामे त्या त्या प्रहरातच करायला हवीत जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ मिळेल.

प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी अंगणात तुळस असतेच, देवपूजा, तुलसी पूजन हे सकाळी केलं जातं व सायंकाळी देवघरात, तुळशीत दिवा लावला जातो व प्रार्थना केली जाते.

अशा प्रकारे तुम्ही रोज सायंकाळी हे काम केलं तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कारण सायंकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते व तिच्या भक्तांना आशीर्वाद देते.

मित्रांनो पण सायंकाळी दिवा लावताना जर या काही गोष्टी केल्या, चुका केल्या तर आपल्याला त्याचे उलट परिणाम भोगावे लागतात आणि या गोष्टी अगदी छोट्या छोट्या चुका नकळत होतात.

विष्णू प्रिय अशी तुलसी माता आपल्यावर तेंव्हाच प्रसन्न होते जेव्हा आपण मनोभावे तिचे पूजन करतो. पहिले म्हणजे तुम्ही तुळशीत दिवा लावताना तुळशीला स्पर्श करू नका.

मित्रांनो धर्मशास्त्र असे मानते की शास्त्रानुसार तुळशीला विनाकारण स्पर्श करू नये, शास्त्र पध्दतीने कोणता उपाय, पूजा विधीसाठी जर तुळशीची पाने लागणार असतील तरच ती तोडावीत व तुळशीला स्पर्श करावा अन्यथा करू नये, माता तुळशी अप्रसन्न होते.

तसेच जर तुम्ही विनाकारण तुळशीची पाने तोडत असाल, मंजुळा तोडत असाल तर माता तुमच्या वरती रुष्ट होते. यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य बनते. आपल्या कामात अडथळे येतात व माता लक्ष्मीचा तो अपमान समजला जातो. त्यामुळे विनाकारण पाने तोडू नये.

मित्रांनो दुसरी गोष्ट संध्याकाळी म्हणजेच जेव्हा सूर्यास्त होत असतो, देवी माता लक्ष्मी घरात येत असते तेव्हा काही महिला घरी झाडू मारतात. स्वच्छता करतात. यावेळी घरात सकारात्मक ऊर्जा लहरी येत असतात, माता लक्ष्मी येत असते त्यामुळे तुम्ही यावेळी चुकूनही झाडलोट करू नये, त्यासाठी लवकर झाडू मारावा.

झाडू ला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे हा तिचा अवमान समजला जातो म्हणून सायंकाळी झाडू मारण्याचे काम चुकूनही करू नये.

मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट, काही घरांमध्ये स्त्रीचा वारंवार अपमान होतो, स्त्रियांची कदर केली जात नाही, त्यांना हि न वले जाते व त्यामुळे स्त्रिया रडतात.

जर सायंकाळी भांडण झाले, स्त्रियांचा अपमान झाला तर माता लक्ष्मी अप्रसन्न होते व घरातून निघून जाते. त्यामुळे स्त्रियांना त्यांचा आदर सन्मान देणे आवश्यक आहे. ज्यामुळे घरात शांतता राहील, समृद्धी येईल व घरी सुख येईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here