नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो शेतकरी अनेक प्रकारची पिके त्याच्या शेतात घेतो, या पिकांची योग्य पेरणी, मशागत, कापणी करतो व हे धान्य त्या त्या मार्केट दरानुसार विकतो. कारण परवडणारा भाव नसेल तर हे धान्य गोदामात साठवून ठेवतो, पण साठवणूक करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घेतली पाहिजे.
मित्रांनो आपले गोदाम हे हवेशीर हवे पण इतकेही नको की पक्षी घर करतील. तसेच बाहेरून कि डे, की टक गोदामात शिरकाव करतील व धान्यात घर करून बसतील व धान्याची नासधूस करतील. त्यामुळे हे धान्य खाण्या लायक राहत नाही कारण त्याचे पीठ झालेले असते.
की डीचा प्रादु र्भाव, मुंग्या व अ ळ्यांना कायमच पळवून लावण्यासाठी आपण काही केमि क ल्स वापरतो, पण जर आपण नैसर्गिकरित्या धान्य साठवणूक केली तर जास्त फायदेशीर होते व त्याचे साईड ई फे क्ट होत नाहीत. त्यासाठी ही घराजवळील एक वस्तू वापरा व या कि डींपासून धान्याचे रक्षण करा.
मित्रांनो गोदामात किंवा घरी साठवलेल्या धान्यात सुमारे 12 प्रकारचे कि डे होतात, यामध्ये अ ळी, भुं गेरा, खा परा कि डा, तांदळातील पतं गा, लु शी, नू शी, उ शी होते. जर का एकदा यांचा शिरकाव झाला तर बाहेर काढणे कठीण होते. कारण यांना पूरक असे वातावरण धान्यात असल्याने प्रज नन क्षमता अधिक वेगाने असते.
मित्रांनो हे किडे जास्त करून पावसाळ्यात आढळतात कारण पावसाळ्यात असणारी आद्रता व कमी तापमान कि ड्यांना पो षक ठरते. कीट कांचा जीवनक्रम 15 दिवसांचा असल्याने त्यांची प्रज नन क्षमता खूप जास्त असते.
कृषितज्ञांच्या नुसार धान्यात अगदी सुरुवातीला कि डे शेतातच लागतात, पीक फुलत असतानाच त्यावर ते अंडी घालतात व त्यांची आपोआप वाढ होत राहते. तसेच ही अंडी पुढे जाऊन जन्माला येतात तोवर धान्य घरी येऊन गोणपाट मध्ये ठेवले जाते व त्यात हे कि टक आसरा शोधत राहतात.
मित्रांनो सुरुवातीला जरी कमी असले तरी त्यांचा प्रादुर्भाव वाढायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगणे चांगले आहे. तसेच जर तुम्ही घरात गोणपाट किंवा पोत्यात धान्य साठवत असाल तर तुम्ही ही खबरदारी घ्यायलाच हवी.
पहिली खबरदारी म्हणजे धान्य कडक उन्हात स्वच्छ ठिकाणी व स्वच्छ कपड्यांवर वाळवून घ्या, तसेच हे धान्य भरताना धान्याची पोती स्वच्छ धुवून घ्या ज्यामुळे प्रादुर्भाव वाढणार नाही. धान्य साठवताना ती जागा स्वच्छ व हवा खेळेल अशी हवी कारण हवेशीर जागा नसल्यास प्रादु र्भाव वाढतो व अ ळ्या होतात.
तसेच धान्य साठवताना थेट जमिनीवर पोती न ठेवता खाली पॉ ली थि न कागद, बांबू अथवा वासे असतील तरी चालते. ज्यामुळे जमिनीतील कि डे धान्यात प्रवेश करणार नाहीत. तसेच ओलावा लागत नाही.
मित्रांनो आपल्या धान्या मध्ये जी वनस्पती घालून ठेवायची आहे ती म्हणजे गुळवेल. ज्यामुळे तुमचं धान्य वर्षभर किडे मुक्त राहील. गुळवेल ही जं तु नाशक वनस्पती आहे. त्यामुळे तिचे बारीक बारीक तुकडे तुम्ही धान्यात टाका . किडे, मुंग्या, अ ळ्या होणार नाहीत. धान्य सुरक्षित राहील.
दुसरी अजून एक वनस्पती म्हणजे जी आयुर्वेदात अतिशय गुणकारी मानली जाते ती म्हणजे कडु लिं बाची पाने अथवा पाला. हा कडु लिं बाचा पाला तुम्ही धान्यात जरी घालून ठेवला तरी धान्य सुरक्षित राहील. काही वेळेस हा पाला मिळत नाही तेव्हा तुम्ही याच्या गोळ्या मेडिकल मधून घेऊन त्या साठवलेल्या धान्यात ठेवल्यास तुमचं धान्य सुरक्षित राहील.
मित्रांनो अशा प्रकारे या छोट्या उपायांनी तुम्ही तुमचे धान्य कि डीपासून बचाव करू शकता, त्रास वाचवू शकता.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच प्रकारच्या उपयुक्त माहिती साठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.