नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त असून प्रत्येक पौर्णिमेचे एक स्वतःचे महत्व सांगण्यात आले आहे. वैशाख पक्षातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमा तिथीला वैशाख पौर्णिमा असे म्हटले जाते.
धार्मिक दृष्ट्या या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्राची विधिवत पूजा केली जाते.
पंचांगानुसार या वेळी दोन दिवसांची पौर्णिमा येत असून उद्या दिनांक 25 मे रोजी कुलधर्म पौर्णिमा तर दिनांक 26 मे रोजी बुध पौर्णिमा साजरी होणार आहे.
यावेळी पौर्णिमेच्या तिथीला विशेष शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरणार आहे.
आता इथून पुढे आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसाला सर्वाधिक महत्व प्राप्त आहे. या पावन दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने मनोवांचित फल प्राप्त होते.
या दिवशी चंद्राची पूजा केल्याने सर्व दोषापासून मुक्ती मिळते. पौर्णिमेच्या पावन दिवशी पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो.
भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख सौभाग्य, धन संपत्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. पौर्णिमेच्या रात्री चंद्र देवाची पूजा करणे अतिशय शुभ फलदायी मानण्यात आले आहे.
या वेळी वैशाख पौर्णिमा दिनांक 25 मे च्या रात्री सर्वार्थ सिद्धी योग सुरु होणार आहे. ज्योतिषानुसार या दोन्ही योगावर कोणतेही शुभ कार्य करणे विशेष फलदायी मानण्यात आले आहे.
या पावन दिवशी चंद्र आणि सूर्य हे दोन्ही वृषभ राशीत विराजमान असतील. हा संयोग या भाग्यवान राशींचा भागोदय घडवून आणणार आहे. आता आपले नशीब पालटायला वेळ लागणार नाही.
वैशाख शुक्ल पक्ष स्वाती नक्षत्र दिनांक 25 मे रोज मंगळवार रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून 26 मे रोजी दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
वैशाख पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.
प्रगतीच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. घर परिवारात सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार असून माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे.
उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत.
भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होण्याचे योग असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
मित्रांनो अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.