नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो भगवान शनिदेव हे कलियुगातील सर्वात जागृत दैवत असून न्यायाचे देवता आणि कर्मफलाचे दाता आहेत. शनी हे नेहमी अशुभ फळ देतात असे नाही तर ते फक्त कार्फलाचे दाता आहेत.
ते कर्मानुसार प्रत्येकाला फळ प्रदान करत असतात. ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा मनुष्याचे नशीब पालटायला वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून शनीच्या कृपेने यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे.
मित्रांनो 23 मे रोजी शनी वक्री होत असून याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण काळ ठरणार आहे.
आता आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून आपल्या जीवनातील शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होण्यास सुरवात होणार आहे.
जीवनात चालू असणाऱ्या दुःख आणि यातनांपासून आपली सुटका होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.
आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर वैशाख शुक्ल पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक 22 मे रोजी शनिवार लागत आहे.
शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला स्मार्त मोहिनी एकादशी म्हटले जाते.
हि एकादशी सर्व पाप नष्ट करणारी अतिशय उत्तम एकादशी मानली जाते. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जात असून प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे.
एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णूला समर्पित असून या दिवशी भगवान श्री विष्णूची उपासना करणे अतिशय शुभ मानले जाते. एकादशी आणि शनिवार हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.
मित्रांनो भगवान विष्णू हे लक्ष्मी पती आहेत. ज्यांच्यावर विष्णूंची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो.
उद्याच्या शनिवार पासून या काही खास राशींवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा बरसणार असून यांच्या जीवनातील अनेक मनोरथ आता पूर्ण होणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळेल. आपण करत असणाऱ्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि मीन रास.
मित्रांनो अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.