नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दुःख आणि संकट कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत नश्चित असतो. मनुष्य जीवन हे अस्थिर असून वेळोवेळी मनुष्याच्या जीवनात अनेक परिवर्तन घडून येत असतात.
बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या जेव्हा ग्रहनक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार असून दिनांक 10 जून पासून यांच्या जीवनातील साडेसातीचा काळ आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे.
शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपला भागोदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनात सुखाचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.
आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. मित्रांनो दिनांक 10 जून रोजी वैशाख महिन्यातील अमावस्या आहे.
या अमावस्येला भावुका अमावस्या असे म्हटले जाते. विशेष म्हणजे या दिवशी शनिजयंती असून सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हा संयोग अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. पंचांगानुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला शनिदेवाचा जन्म झाला होता.
त्यानुसार या दिवशी शनिजयंती साजरी होत असते. याशिवाय अमावस्या तिथीला या वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागत आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तासांचा असून 10 जून रोजी दुपारी 1 वाजून 41 मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे.
हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळले जात नाही किंवा सुतक काळ अमान्य असेल. वैशाख महिन्यातील हि अमावस्या अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे.
मित्रांनो अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सूर्याला अर्घ दिल्या नंतर पितरांचे तर्पण करून दान धर्म केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती लाभते.
पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी उपवास देखील केला जातो. या दिवशी शनी जयंती असल्यामुळे शनिदेवाला तेल, काळे तीळ, काळे उडीद, काळे कापड आणि लोखंड अर्पण करणे अतिशय शुभ मानण्यात आले आहे.
मित्रांनो भगवान शनी हे न्यायचे देवता असून ते कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून ज्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही.
शनिजयंती पासून या काही खास राशींवर शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागनार नाही.
आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून सुख सौभाग्य आणि धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.